Friday 6 November 2020

BOOK 13: शक्ती, युक्ती व बुध्दी द्वारे समस्यांना विकासाची शिडी बनवण्याचा मंत्र - प्रतिसाद

पुस्तकाचे नाव: शक्ती, युक्ती व बुध्दी द्वारे समस्यांना विकासाची शिडी बनवण्याचा मंत्र - प्रतिसाद
लेखक: मनोज अंबिके
प्रकाशन: mymirror publishing house
 
साधारणतः रात्री ०१ वाजता हे पुस्तकं हाती घेतलं. झोप येत नव्हती. विचार केला की एखादं पुस्तक वाचायला घेऊ तर आपोआप झोप लागेल. पहिले ५-१० पाने वाचली आणि उत्कटता वाडत गेली. पुढे काय होणार हे वाचण्याच्या नादात वेळ कशी निघून गेली कळलं पण नाही. सलग बसून एका बैठकीत वाचून  काडलं. सरासरी ८ तास लागले असतील. पण पुस्तकाची किमया अशी की सोडावं वाटलं नाही.
गोष्ट आहे. आदित्य ची. आदित्य, एक मुलगा ज्याचं पूर्ण बालपण हॉस्टेल मध्ये गेलं. आई वडील नाही. कुठून आला काही पत्ता नाही. त्याचा MBA होतं. त्याला वाटत की एखाद्या corporate company मध्ये काम करावं. पण कदाचित त्याची वाट वेगळी होती. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी त्याच्या आयुष्यात एक वेगळं वळण येत. ज्या संस्थे मार्फत त्याच शिक्षण होत होत त्या शाळेतून त्याला बोलवण येतं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात सगळं काही अनपेक्षित अस घडत जातं. ज्या संस्थेमुळे त्याचं पूर्ण शिक्षण झालेलं असतं त्याच संस्थे चा पूर्ण कारभार याच्या खांद्यावर येऊन पडतो. त्याच्या साठी आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट शॉक असते. त्याला काय करावं सुचत नाही. सगळं काही नवीन असतं. येणारा प्रत्येक दिवस एक नवीन समस्या घेऊन येत असतो. पण अश्या स्थितीत सुद्धा तो परिस्थिती हाताळतो. 
या प्रवासामध्ये त्याच्या समोर जे अडथळे येतात तो कसा मात करतो हे वाचण्यासारखं आहे. त्याच्या मनाची घालमेल. त्याला झालेलं विरोध. संस्थे मधील विरोधी जाणारे लोक, पाठिंबा देणारे लोक, मानसिक आधार देणारे गुरुजी या सगळ्याचं वर्णन असं आहे की डोळ्या समोर चित्र उभारल्या सारखं वाटत. 
गुरुजी आणि आदित्य मधल संभाषण वाचताना मन आध्यात्मिक व्हायला होत. कुठतरी आपल्यात पण सकारात्मक ऊर्जा आल्यासारखं वाटायला लागतं.
तो ह्या सगळ्या गोष्टीना कसा तोंड देतो हे पाहण्या सारखं आहे. आयुष्या मध्ये येणाऱ्या समस्यांना श्री प्रभू रामचद्रांचे दास हनुमानाचे गुण कसे लागू पडतात हे वाचनीय आहे. 
मला वाटतं ज्यांना फक्त प्रॉब्लेम दिसत राहतात त्यांना हे पुस्तक आधी वाचायला पाहिजे. कदाचित याने आपला प्रॉब्लेम कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. तशी सुरेख मांडणी आहे 
पुस्तकाची.
पुस्तकातील काही संवाद तर मनाला स्पर्श करून जातात. एके ठिकाणी गुरुजी म्हणतात,
" ज्याने संकट दिलं, समस्या दिली तोच समाधान पण देत असतो. फक्त जिथं संकट आहेत, समस्या आहेत तिथं जाऊन थांब. ज्या वेळेस तुम्ही समस्येपासून लांब पळता, उत्तर पण तुमच्या कडून लांब जात. संकटाच्या, समस्येच्या डोक्यावर जाऊन बस. जेव्हा तू संकटाच्या, समस्येच्या डोक्यावर जाऊन बसतोस , तेव्हा तुला तिथच उत्तर सापडतं. या जगात अस कुठलाही संकट नाही, समस्या नाही की ज्यात समाधान नाही. फक्त आपण संकटापासून लांब पाळायचा प्रयत्न करतो. म्हणूनच समाधान समोर असून सुध्धा आपल्याला दिसत नाही."
अजुन एक ठिकाणी ते म्हणतात,
" प्रत्येक घटनेमागे काहीतरी उद्दिष्ट असतं. उद्देश असतो. आपल्याला खूप वेळेला तो उद्देश कळत नाही. आपल्याला ती समस्या वाटते. आपल्याला ते संकट वाटतं. समस्यांचा, संकटांचा अर्थ सुरुवातीला कळत नाही. पण जसं- जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला समजतं की त्या अडचणी नव्हत्याच. या आपल्या मदातीकरिता आल्या होत्या. हा दृष्टिकोन नसल्या मुळे गफलत होते."

मानवी मनाच्या काही कडा व्यक्त करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत अस वाटत. मानवी स्वभाव छटा दाखवल्या आहेत. हनुमानाचे प्रतीक वापरून समस्या च उत्तर पण सांगितलं आहे.
मला तर हे पुस्तक फार आवडलं आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुधा हे पुस्तकं नक्कीच आवडेल. तुम्ही वाचल्या नंतर नक्की प्रतिक्रिया द्या. तुमच्या प्रतिसादाची आतुरता राहील. धन्यवाद.
आपला, 
गुरु बारगजे
www.gurusreads.blogspot.com

New year 2021

परत एक नविन वर्ष सुरुवात होणार....अगदी दरवर्षी होत तसच . पण या वर्षात आणि ईतर नविन वर्षात खुप फरक आहे. काय काय पहायला मिळाल, कित्येक अनुभव आ...