Labels

Showing posts with label अंधश्रद्धा निर्मूलन. Show all posts
Showing posts with label अंधश्रद्धा निर्मूलन. Show all posts

Wednesday, 1 January 2020

BOOK 10: तिमिरातून तेजाकडे-समग्र अंधश्रद्धा निर्मूलन व पुढे (भाग १)

BOOK 10: तिमिरातून तेजाकडे-समग्र अंधश्रद्धा निर्मूलन व पुढे
लेखक: डाॅ. नरेंद्र दाभोलकर
प्रकाषक: राजहंस प्रकाशन प्रा. लि.



माझ्या हाती पडलेलं डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांचं हे दुसरे पुस्तक. त्यांच्या " विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी" या पुस्तकाबद्दल मी यापूर्वी लिहिलेलं आहे.





डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांचं हे दुसरे पुस्तक प्रामुख्याने ३ भागात विभागले आहे. 
१) विचार
२) आचार
३) सिद्धांत
या पुस्तकाबद्दल मी दोन टप्प्यांत लिहिणार आहे.
डॉ नरेंद्र दाभोळकरांनी "विचार" मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, फलज्योतिष, वास्तुशास्त्र, संमोहन, भानामती, बुवाबाजी इ. विषयांवर अगदि परखड भूमिका मांडली आहे.
आपण त्याकडे थोडक्यात बघुया.
I) वैज्ञानिक दृष्टिकोन:
 कोणत्याही गोष्टीमागचा कार्यकारणभाव शोधने म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. यासाठी फार मोठ्या तांत्रिक व्याख्येची गरज नाही.वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्यासाठि विज्ञान शाखेची पदवी लागते का? तर अजिबात नाही. आसपासचे जग काही नियमानुसार चालते. ते जाणून घेण्याचे कुतुहल असेल तरी पुरेसे आहे.
 वैज्ञानिक दृष्टिकोनात भारत मागे का?
- याची काही ढोबळ कारणे अशी:

१) बाबावाक्य प्रमानम-
अर्थात बाबाजी जे बोलतील तेच खरं. मग त्याची चिकित्सा तर दुरच राहिली, त्या बद्दल शब्द सुद्धा गुन्हा ठरवला जातो.

२) ज्ञानबंदि-
कित्येक शतके भारतात जातिव्यवस्था बळकट होती व आजही काही प्रमाणात ती अपवादाने का असेना पण दिसुन येते. पुर्वी हे खुप तीव्र असायचं.या जातीव्यवस्थेमध्ये तथाकथित अस्पृश्य जातीतील लोकांना ज्ञानसंपादनाची परवानगी नसायची. स्त्रियांना तर ज्ञानबंदि होतीच होती. आणि जे काही शिक्षण असायचं ते धार्मिक शिक्षण व आकडेवारी यापलीकडे कधी गेलच नाही. जिथे ज्ञानच नाही तिथं विज्ञान कुठुन येणार. वैज्ञानिक दृष्टिकोन तर शक्यच नाही.

3) शंका निरसन न होणे
लहान मुलांच्या मनात बऱ्याच गोष्टींना घेऊन कुतुहल असते. ते खुप प्रश्न विचारतात. अशा वेळी त्यांच्या शंकांचे निरसन होणे आवश्यक असते पण बहुतेक वेळा समाधान होण्यापेक्षा त्यांना गप्प बसण्यास सांगितले जाते. तिथेच त्यांच्या चिकित्सक वृत्तीला लगाम लावला जातो. मग लहानपणापासून असे संस्कार घेऊन मोठी झालेली व्यक्ती चिकित्सक असेल काय? वैज्ञानिक दृष्टिकोनासाठि व्यक्ती चिकित्सक असने गरजेचे आहे.

४) व्यक्तिंचे दैवतिकरण
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला देवस्थानी बसवले कि आपण आपली पुर्ण विवेकबुद्धी तिथं गहाण ठेवली असं समजा. आपली श्रद्धा अशी होऊन जाते कि त्या व्यक्तीने काही हि केले किंवा सांगितले तर आपल्याला ते मान्यच असते.  काहि महाभाग तर इथपर्यंत पोहोचतात कि फक्त आमचे बाबा किती "खरे" आणि बाकीचे किती "भोंदू" आहेत. श्रद्धा असणं गैर नाही पण आपण कुणावर श्रद्धा ठेवतोय हे पाहणं पण गरजेचे आहे.

५) राजकीय अनास्था
काहि राजकीय नेत्यांना याची जाणीव असते कि आपल्या मुक-सहकार्यातून गैरप्रकार वाढु शकतात पण लोकक्षोभ नको म्हणुन कारवाई टाळली जाते.

II) फलज्योतिष शास्त्र (?)
कोणतीही बाब शास्त्र म्हणुन उतरण्यासाठी एक ग्रहितक मांडावे लागते. विज्ञानाच्या कसोटीवर ते तपासून सिद्ध झाले तर त्यास शास्त्र आहे असे संबोधले जाते.
फलज्योतिषाचा सर्व व्यवहार ज्या मांडणीवर उभा आहे ते ग्रहितक असे.-
१) आकाशस्थ ग्रहगोलांचा परिणाम मानवी जीवनावर सतत होत असतो.
२) मानसाच्या जन्मवेळेवर तो अवलंबून असतो.
३) त्यामुळे व्यक्तीचे भविष्य ठरते किंवा जे ठरलेले आहे ते कळते आणि बदलतेहि.

याच आधारावर सर्व फलज्योतिषाचा पसारा उभा आहे. आता यातील पोकळपणा पाहु.
एक तर आकाशातील कोट्यावधी ग्रहताऱ्यांपैकी काही मोजक्या ताऱ्यांना कुंडलीत स्थान आहे. बाकीच्या ग्रहताऱ्यांना काडीची किंमत नाही. 
कुंडलीत आढळणारे ग्रह म्हणजे सुर्य, चंद्र,मंगळ,बुध, गुरु,शुक्र,शनी,राहु व केतु. सुर्यमालिकेतील युरेनस, नेपच्यून व प्लुटो हे ग्रह १५० वर्षांपूर्वी कुंडलीत नव्हतेच, कारण त्यांचा शोध लागला नसल्यामुळे ज्योतिशांना ते ठाऊक नव्हते.बर तेहि जाऊ द्या. कुंडलीतील कथित नवग्रहाची स्थिती काय आहे? यांपैकी सुर्य हा तारा आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. राहु , केतु नावाचे ग्रह तर अस्तित्वात च नाहीत. चंद्र या उपग्रहाला जर कुंडलीत स्थान आहे तर इतर उपग्रहांना पण असायला हवे. पण तसेही आढळत नाही. 
व्यवस्थित विचार केला तर हा सगळा गडबड घोटाळा लक्षात येतो.

III) वास्तुशास्त्र
खरेतर या गोष्टीची चर्चा होण्याची गरज नाही पण तरीही ती चर्चा करावी लागते हेच मुळात चुकीचे वाटते. स्वतःचे घर असणं हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे.मग ते घर लाभावं अशी मनस्वी इच्छा असते. घर लाभत म्हणजे काय तर भरभराट व्हावी , बढती मिळावी, धंद्यात फायदा व्हावा इ. पण त्या मागचे कारण न शोधता वास्तु च खराब आहे असं ग्रहित धरल जातं. मग ती वास्तु शांती (?) केली जाते. खरच याला काही कार्यकारणभाव आहे का ? भरभराट होणे, बढती होणे यात तुम्ही केलेल्या कामाचे फळ असणार आहे, यात तुम्ही कोणत्या वास्तु मध्ये राहतात याला काडिची किंमत नाही.

IV) मन व मनाचे आजार
मुळात मन आजारी पडतं म्हणजे काय होतं हे लक्षात घेणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असे लक्षात येते की एखाद्या व्यक्तीला वेड लागल्यासारखे होते, व्यक्ती असंबद्ध बडबड करते, कधी-कधी अंगात पण येते. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ती व्यक्ती प्रत्येक वेळी नाटक करत नसते, ती त्या व्यक्तीची प्रामाणिक प्रतिक्रिया असु शकते. 
एक उदाहरण घेऊ. गावाकडे काही स्त्रियांच्या बाबतीत असं आहे की त्यांच्याकडे व्यवहार नसतो, त्यांच्या मताला कोणी किंमत देत नाही, घरात दुय्यम स्थान दिलं जातं. अशा वेळी त्यांच्या मनातील भावना व विचार त्या मनमोकळेपणाने व्यक्त करू शकत नाहीत. हे विचार असेच साचत जावून त्यांच्या मनावर ताण येऊन वरील प्रकार घडु शकतो. त्यातल्या त्यात ज्या व्यक्तीला कोणी विचारत नाही त्यांना अंगात देवी आल्यावर सगळे मान देतात. ज्या व्यक्तीला कोणी विचारत नसतं त्या व्यक्तीसाठी हि सुखद अनुभव असु शकतो. अशा वेळी त्या व्यक्तीस दोष देण्यापेक्षा समजून घेतलं तर ते अधिक प्रभावी होईल.

V) बुवाबाजी
बुवाबाजीचे पीक या भुमीत भरघोस येण्याचे कारण म्हणजे अति दैववाद व नशीब नावाच्या काल्पनिक गोष्टी वर अती विश्वास.
बुवाबाजीचे डॉ नरेंद्र दाभोळकरांनी २० मुख्य कारणे दिली आहेत. त्यातली काही अशी:
१) अगतिकता, अस्थिरता व अपराधीपणा
आजच्या जगात पुढच्या क्षणी काय होईल याची खात्री नाही. मला काही झालं तर काय याची काळजी नेहमी असते. येण्यऱ्या संकटातून माझे बाबा सुटका करतील अशी आशा भक्त करत असतो.
कधी-कधी केलेल्या चुकांना घेऊन एक अपराधीपणाची भावना मनात असते. बाबांना शरण गेलं म्हणजे आपले पाप धुतले जातील अशी आशा भक्तास असते.
२) अतृप्त कामना
सगळं काही मनासारखं व्हावं असं वाटणं
३) मानसिक आधार
४) आत्मा,परमात्मा,ब्रम्ह, परब्रह्म,मोक्ष, मुक्ती या शब्दांचे मायाजाल
५) अवतारवाद
६) सामाजिक प्रतिष्ठेचा लाभ इ.
७) चमत्कार
चमत्कारांना सत्य मानणे आणि कोणतीही शंका उपस्थित न करता चमत्कारांना शरण जाणे हे मानसिक गुलामगिरी चे लक्षण आहे.

यांपैकी बुवाबाजी या प्रक्रियेतून एकुणच जी मानसिक गुलामगिरी तयार होते, तिचे गांभीर्य सर्वाधिक आहे.

या ब्लाॅग पोष्ट मध्ये इतकंच. या पुस्तकाचे "आचार व सिद्धांत" आपण पुढिल पोष्ट मध्ये पाहु.
धन्यवाद.

आपला, 
गुरु बारगजे
www.gurusreads.blogspot.com



Wednesday, 19 June 2019

Book 5: विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी

पुस्तकाचे नाव: विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी
लेखक: डाॅ. नरेंद्र दाभोलकर
प्रकाषक: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
काही पुस्तके अशी असतात जी फक्त पानांचा संग्रह न ठरता विचारांचा उद्रेक ठरतात. त्यातल्या त्यात जेव्हा ती पुस्तके सद्य परिस्थितीशी साधर्म्य दाखवणारी असतात तेव्हा आपोआपच त्यांच मोल कैकपटीने वाढतं. हे पुस्तक म्हणजे असाच विचारांचा एक विस्फोटक खजिना आहे. यातील एक एक लेख वाचताना आपण किती पुरोगामी (?) आहोत याची जाणीव प्रकर्षाने होते.

अंधश्रद्धा म्हटले की आपल्याला फक्त बुवाबाजी आठवते. खरं तर बुवाबाजी ही अंधश्रद्धेच्या अनेक बाजुंपैकी एक बाजू झाली. अंधश्रद्धेची तशी एक ढोबळ व्याख्या करायची झाली तर ती अशी करता येईल. ज्या गोष्टीला कुठलाही कार्यकारणभाव नाही त्या गोष्टी ला अनुसरण करणे म्हणजे अंधश्रद्धा. यावर तथाकथित लोक जे स्वतःला धर्माचे पाईक व रक्षक समजतात त्यांचा विरोध होतो, कारण कार्यकरण भाव लावणारा माणूस विचार करायला लागतो. आणि जो व्यक्ती विचार करायला लागतो तो प्रश्न विचारायला लागतो. आणि प्रश्न विचारणारे अनुयायी कोणालाच नको असतात. याचं कारण अगदी साधं आहे. विचार करणारं मन कधी मानसिक गुलामीत राहत नाही.
आणि याचा परिणाम सरळसरळ हित संबंधावर होतो.
मग काय करायचं तर सर्व सामान्य माणसाला अश्या गोष्टींमध्ये अडकाऊन टाकायचं कि त्यांनी विचार च केला नाही पाहिजे. जरी एखादा माणूस देवा बद्दल किंवा धर्माबद्दल काही चिकित्सक बोलत असेल तर त्याला धर्मद्रोही ठरवलं जातं. 
आपण बऱ्याच लोकांकडून ऐकले असेल किंवा वाचलं असेल कि या या बुवाबाबा कडुन आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक त्रास झाला किंवा फसवणूक झाली तेव्हा असे का होते याचा विचार केला तर असे लक्षात येईल की त्यांच्या कडे जाणारा व्यक्ती कुठे तरी एक आधार शोधत असतो. आधाराच्या शोधात ती व्यक्ती इतकी गुरफटून जाते की आपली कोणी फसवणूक करत आहे हेच मुळी लक्षात येत नाही. अशा वेळी हे हितचिंतक (?) वेगवेगळ्या मार्गाने ,आलेल्या लोकांना असे काही संमोहित करतात कि लुटणारे बुवाबाबा च त्यांना त्यांचे मसिहा वाटायला लागतात.
मग यावर काय करायचं याचा उपचार डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अगोदरच सांगितलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याची काळजी घेते कि कोणाचीही अशा व इतर गैरमार्गाने फसवणूक होऊ नये. 
या चळवळीची एक चतु:सुस्त्री आहे. 
१) शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे;
२) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे व त्या आधारे विविध घटना तपासणे;
३) धर्माची विधायक कृतिशील चिकित्सा करणे म्हणजे धर्माबद्दल काही आकलन व धर्मनिरपेक्षतेचा वेगळा दृष्टीकोन रुजविणे;
४) व्यापक परिवर्तनाचे भान जागृत करणे,सजग करणे.

या मुख्यतः चार उपाययोजना करुन अंधश्रद्धांना बऱ्यापैकी आळा घालणं शक्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केवळ शिक्षणाने फरक पडत नाही तर त्यासाठी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. कारण आजच्या (२१ शतक चक्क) काळात हि घर आपण बांधून घेतो पण त्याची शांती(?) केल्या शिवाय राहत नाही. अगदि तसेच अशिक्षित सोडा पण शिकलेल्या लोकांच्या अंगात येते,आम्हि वाहनाला लिंबु - मिरची लावतो, कुठल्याही शेंदुर लावलेल्या दगडाच्या पाया पडतो, आजही काही गावांमध्ये आजारी पडल्यावर जाणत्या चा सल्ला घेतला जातो. या सगळ्या गोष्टी आपल्या पुरोगामी (?) महाराष्ट्रात घडतात पाहुन आपल्या समाजाच्या मानसिक दारिद्रयाची किव येते.
अंधश्रद्धेचा अतिरेक कधी कधी निरपराध लोकांचा जीव घेतो. या सगळ्या गोष्टी पासुन जर विकास करता आला असता तर आपल्याला विज्ञानाची गरज पडली नसती.
थोडासा विचार केला तरी लक्षात येईल की हा सगळा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी केलेला प्रकार आहे.अशा लोकांपासून सावध व्हायला हवं.
अंधश्रद्धेविरुद्ध ची लढाई सोपी नाही कारण बुवाबाजी आज परमोच्च बिंदू ला पोचली आहे. तोंडी प्रचारा पासुन ते डिजिटल प्रचारा पर्यंत यांची मजल पोचली आहे. सोबत त्यांचे लाखो अनुयायी तर असतातच. हे लाखो अनुयायी आपली मतपेटि बनलेली कोनाला नाही आवडणार? मग या सर्व प्रकाराला राजकीय मुक संमती दिली जाते. आजुबाजुला थोडी नजर टाकली तर आपल्याला ते लक्षात येईल. मग काय करायचं? शांत बसायचं का? तर बिलकुल नाही. आजच्या घडीला आपण स्वत: पासुन सुरुवात करु शकतो. आपण एवढेच करायचं कि ढोंगी लोकांना ओळखुन त्यांना आपल्या व आपल्या परिवाराच्या आजूबाजूला फिरकु द्यायचं नाही.
Start it small and make it large.
कारण परिवार हा समाजाचा प्रारंभ आहे.

पण ढोंगी कोण आणि साधु कोण हे कसं ठरवायचं? मग खालील शब्द नीट वाचा.

" जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,
तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जानावा."

-धन्यवाद,
गुरू बारगजे
www.gurusreads.blogspot.com

New year 2021

परत एक नविन वर्ष सुरुवात होणार....अगदी दरवर्षी होत तसच . पण या वर्षात आणि ईतर नविन वर्षात खुप फरक आहे. काय काय पहायला मिळाल, कित्येक अनुभव आ...